अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणतात.
- प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि अखंडता हे तीन नवीन शब्द समाविष्ट केले.
- नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये आता कलम ५१ (अ) मध्ये आहेत.
- राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे बंधनकारक केले आहे.
- प्रशासकीय न्याय व्यवस्थेसाठी व्यवस्था केली.
- 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती केली.
- घटनादुरुस्ती न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या क्षेत्राबाहेर ठेवण्यात आल्या.
- न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे अधिकार कमी केले.
- लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 6 वर्षांपर्यंत वाढवला.
- काही कायद्यांमुळे मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते; त्यावर न्यायालये निर्णय घेऊ शकत नाहीत.
- संसदेला देशातील विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार मिळाला.
- तीन नवीन मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली. उदाहरणार्थ, समान न्याय, मोफत कायदेशीर मदत, कामगारांचा सहभाग, आणि पर्यावरणाचे संरक्षण.
- भारतातील कोणत्याही भागात राष्ट्रीय आणीबाणी लागू करणे सोपे झाले.
- घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्ष करण्यात आला.
- कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी सशस्त्र सैनिकांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला मिळाले.
- राज्य सूचीतले 5 विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदाहरणार्थ, शिक्षण, जंगले, प्राण्यांचे संरक्षण, वजन आणि मापे.
- संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता हटवली.
- संसदेचे सदस्य आणि समित्यांचे अधिकार निश्चित करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले.
- अखिल भारतीय न्यायिक सेवेसाठी तरतूद केली.
- चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यात आपली बाजू सांगण्याचा अधिकार बंद केला आणि शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सोपी केली.

Leave a Reply